अधिवेशन आलं की सरकार कोरोना वाढवते; राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप

आज सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 121 व्या जयंती दिनानिमित्त लोणी येथे बोलत होते.
अधिवेशन आलं की सरकार कोरोना वाढवते; राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप
अधिवेशन आलं की सरकार कोरोना वाढवते; राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोपSaam Tv

शिर्डी: अधीवेशन आलं की सरकार कोरोना (Coronavirus) वाढवते राज्यात विविध संकटे असताना जनतेला दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारला (MahaVikasAghadi ) अधिकारी कर्मचाऱ्यांची बदल्यांमध्ये जास्त रस दिसत आहे. अशी कोणती घटना घडली की अधिकाऱ्यांच्या बदलीची स्थगिती उठवण्यात आली अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार राज्यात झाला असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते आज सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 121 व्या जयंती दिनानिमित्त लोणी येथे बोलत होते.

दुर्दैवाने अधिकाऱ्यांचे दर पत्रक छापण्यात आले होते. कोणत्या अधिकाऱ्याला कोणत्या ठिकाणी बदली द्यायची अन त्याचे पैसे किती मोजावी लागेल असे दरपत्रक काढण्यात आले असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारवर विखे पाटलांनी केला आहे.

अधिवेशन आलं की सरकार कोरोना वाढवते; राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप
शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाब्बासकी देण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा राज्यामध्ये सुरू आहे. या राज्यातील सर्वच मंत्री मुख्यमंत्र्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मनमानी पद्धतीने आपल्याला पाहिजे तसा निर्णय करत याच्यामध्ये जे मोठे अर्थकारण दडलेले आहे. केव्हा तरी त्याचा स्फोट होईल त्याबद्दल मी पुराव्यानिशी भूमिका अधिवेशनात घेणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com