
मुंबई - राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हा वाद आता मिटणार असल्याचे बोलले जात आहे. कारण या प्रकरणात आता खुद्द एकनाथ शिंदे स्वतः मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. (Maharashtra Political Crisis)
रवी राणा आणि बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निमंत्रण दिलं आहे. आज मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक होणार आहे.
आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.तर पैसे घेतल्याचे रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. माझ्यासोबत १२ आमदार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
दोघांमध्ये वाद सुरू असलेला वाद शमविण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी करावी असे आवाहन केले होते. त्यानंतर आज मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण आता काई नवीन वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.