दिनू गावित
नंदुरबार: गेल्या दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र महिला व बाल कल्याण समिती सदस्यांनी नंदुरबार जिल्हा दौरा केला. या समितीने दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. परंतु दौऱ्यानंतर लगेचच, जिल्हा प्रशासनातील बांधकाम विभाग व आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे एका महिलेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सातपुडा अतिदुर्गम अक्राणी विधानसभा चे आमदार व महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी K.C Padvi यांच्या मतदार संघातील चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाल्याने चांदसैली येथील सिदलीबाई पाडवी या महिलेचा तळोदा येथे उपचारासाठी जाताना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तडफडुन मृत्यू झाला आहे.
चांदसैली येथील रहिवासी सिदलीबाई पाडवी यांना रात्री पोटात अचानक वेदना सुरू झाल्याने खाजगी वाहनाने तळोदा येथे उपचारासाठी जात असताना धडगाव व तळोदा शहरांना जोडणाऱ्या चांदसैली घाटात 1 दिवसापूर्वी कोसळलेली दरड हटवली नसल्यामुळे महिलेच्या पतीने उपचार मिळावे यासाठी खांद्यावर घेऊन पायपीट करत तोळदा कडे जात असताना महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर प्रशासन जागे झाले असून सदर रस्त्यावरील दरड बांधकाम विभागाच्या वतीने हटवण्याचे काम सुरु केले असल्याची माहिती अपर जिल्हा अधिकारी महेश पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागात ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आरोग्य विभागाचे कर्मचारी वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे आदिवासी पाड्यांवरील नागरिक खाजगी वाहनाने तळोदा तालुक्यातील खाजगी दवाखान्या कडे धाव घेतात. सदर महिलेच्या चांदसैली गावात आरोग्य विभागाचे उपकेंद्र उपलब्ध असून या ठिकाणी योग्य उपचार न मिळाल्यामुळे सदर महिलेच्या पतीला खाजगी वाहनातून तळोदा ला घेऊन जाण्याची वेळ आली.
परंतु 1 दिवसापूर्वी चांदसैली घाटात कोसळलेली दरड प्रशासनाने वेळेवर दुरुस्त न केल्यामुळे सिदली बाई पाडवी या महिलेला वेळेत दवाखान्यात जाऊन उपचार घेता आले नाही. त्यामुळे त्यांचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री ऍड. के सी पाडवी यांच्या मतदार संघात अशा घटना घडत असेल तर आदिवासी विकास मंत्री काय विकास करतील असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागा सह इतर तालुक्यांमध्ये देखील आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. तसेच उपलब्ध कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे वेळेत उपचार मिळत नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्यांचा आसरा घ्यावा लागतो. शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागात द्वारे दुर्गम भागात सोयीसुविधा पोहोचावे यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो आहे. रस्ते आरोग्य शिक्षण यासाठी वर्षानुवर्षे निधी खर्च करण्यात येतो परंतु प्रत्यक्षात याचा लाभ जनतेला होताना दिसून येत नाही हे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.
Edited By-Sanika Gade
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.