अकोला: अकोल्यातील अकोट (Akot) तालुक्यातल्या उमरा येथील एका शेतकऱ्याने (farmer) वाढत्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहन हरीदास इंगळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने स्वतः च्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शेतकर्याने (farmer) आपल्या २ एकर कांदा (Onion) पेरणी केली होती.
हे देखील पाहा-
परंतु या वर्षी कांद्याला उत्पादन घटले आहे. व त्यातच भाव न मिळाल्याने आता बँकेचे कर्ज भरण्यासाठी उसनवारी पैसे घेऊन आपले पिक कर्ज भरले होते. नापीकीमुळे या शेतकऱ्याला कर्ज भरलेल्या पैसे कसे परत करावे ही चिंता सतावत होती. यांच्याकडे ३ एकर शेती आहे. त्यांना गेल्या बर्याच वर्षांपासून अपेशित उत्पादन होत नसल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत या शेतकऱ्याने स्वताच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. त्याच्या मागे २ विवाहित बहिणी आई- वडील असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून, शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात अकोट येथे दाखल करण्यात आला होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.