पेरणीच्या काळातच शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं मिळत नसल्यानं शेतकरी त्रासून गेलेत. खतं आणि बियाणं विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानं कृषिमंत्री दादा भुसे यांनीच या काळ्या बाजाराचा पर्दाफाश केलाय.
खरिपाच्या पेरणीलाच राज्यातल्या शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा, लिंकिंग आणि जादा दरानं हैराण केलंय. तोंड दाबून बुक्क्यांचा मार शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वतः शेतकऱ्यांची ही अवस्था औरंगाबादमध्ये अनुभवली. दादा भुसे स्वतः शेतकरी बनून औरंगाबादमधल्या नवभारत फर्टीलायझर या दुकानात गेले. पण खतं उपलब्ध असतानाही दुकानदारानं ते द्यायला नकार दिला. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात खतांच्या टंचाईसोबत दरवाढीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय.
रेल्वेच्या रेक पॉइंटमुळे ही समस्या उद्भवल्याचं सांगत कृषी विभागानंही हतबलता व्यक्त केलीय.
काही ठिकाणी शेतकऱ्यांना खताच्या मूळ किमतीच्या पन्नास ते शंभर रुपये जादा दरानं खरेदी करावी लागतेय. तसंच पक्क्या बिलांऐवजी कच्ची बिलं देत असल्याचंही उघड झालंय. कृषी विभाग खत उपलब्ध असल्याचं छातीठोकपणे सांगत असलं तरी शेतकऱ्यांची मात्र कुचंबणाच होतेय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.