आसाम, बिहारमध्ये पुराचं थैमान; आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू

आसाम, बिहारमध्ये पुराचं थैमान; आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू

आसाम, बिहारमध्ये पुराने थैमान घातलंय. पुराच्या तडाख्याने याठिकाणी आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झालाय. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे बिहारमध्ये ३४ तर आसाममध्ये १५ जणांचा बळी गेलाय. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पुरात अडकलेल्या नागरिकांनी सुरक्षितकस्थळी हलवलं जातंय.

आसामच्या मोरीगावला पुराचा फटका बसलाय. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच मोरीगावमध्ये पुरात अडकलेल्या एका चिमुरड्याची एनडीआरएफच्या जवानांकडून सुटका करण्यात आलीय.

काझीरंगा नॅशनल पार्कलाही पुराचा फटका 

आसाममधल्या काझीरंगा नॅशनल पार्कलाही पुराचा फटका बसलाय. काझीरंगा अभयारण्यात ब्रह्मपुत्रेचं पाणी घुसल्याने हजारो प्राण्यांवर संकट आलंय. इथला ८० टक्के भाग पाण्याखाली गेलाय. तर 95 शिबिरंही पाण्यात बुडालीत. त्यामुळे या प्राण्यांना स्थलांतर करावं लागलं. पावसाचे पाणी अभयारण्यात घुसल्याने प्राण्यांना उंचावरील प्रदेशात हलवण्यात आलंय. तसंच या प्राण्यांची खाण्याची अबाळ होणार नाही याकडे वनाधिकारी लक्ष ठेवून आहेत.

WebTitle : marathi news flood hits aasam and bihar forty nine lost their lives

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com