राज्यात रेंगाळलेल्या पावसाने शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई साठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज पार पडली. अवकाळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचसोबत केंद्र सरकारला राज्य सरकाने अधिकच्या मदतीची मागणी केलीये.
नुकसानाची विभागनिहाय माहिती :
कोकण - (46 तालुके/97 हजार हेक्टर)
नाशिक - (52 तालुके/16 लाख हेक्टर)
पुणे - (51 तालुके/1.36 लाख हेक्टरहून अधिक)
औरंगाबाद - (72 तालुके/22 लाख हेक्टर)
अमरावती - (56 तालुके/12 लाख हेक्टर)
नागपूर - (48 तालुके/40 हजार हेक्टर).
साधारणत: 53 हजार हेक्टरवर फळपिकं, 1 लाख 44 हजार हेक्टरवर भात, 2 लाख हेक्टरवर ज्वारी, 2 लाख हेक्टरवर बाजरी, 5 लाख हेक्टरवर मका, 19 लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे तितक्याच हेक्टरवर 19 लाख हेक्टरवरील कापूस पीकाचे नुकसान झाले आहे.
WebTitle : government to bailout ten thousand core relief fund for farmers affected with un seasonal rain
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.