डकवर्थ लुईसचा खेळ फारच किचकट आणि कधी कधी अन्यायकारकही असतो. भल्या भल्यांना त्याचे गणित अजूनही उमगलेले नाही. षटके कमी झाल्यावर तयार करण्यात येणारे आव्हान चक्रावून सोडणारे असते. उपांत्य फेरीचा हा सामना सध्या पावसामुळे थांबलाय खरा पण भारतीय खेळाडूंच्या डोक्यात विचार चक्र सुरु झालीय आणि जेव्हा नेमके काय करावे लागेल या निर्णयाशी येताच युझवेंद्र चहलची दोन षटके आपल्याला महागात तर पडणार नाही ना याची भिती वाटू लागते.
नेमके काय झाले ते पाहा :
खेळ थांबतो तेव्हा किती षटके झाली आणि किती शिल्लक आहे तसेच विकेट किती गमावल्या आहेत यावर डकवर्थ लुईसचे गणित तयार होते. त्यानुसार जर षटके कमी झाली तर भारतासमोर
46 षटकांत 237 धावा
40 षटकांत 223 धावा
35 षटकांत 209 धावा
30 षटकांत 192 धावा
25 षटकांत 172 धावा
20 षटकांत 148 धावा
असे आव्हान असणार आहे तेव्हा चहलली ती दोन षटके महागात पडण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.