जिल्हा सहकारी बँकांच्या पैशांवर साखर सम्राटांनी डल्ला मारल्याने, पाच जिल्हा सहकारी बँकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अकरा सहकारी साखर कारखाऩ्यांच्या संचालकांनी पाच सहकारी जिल्हा बँकांना 1400 कोटी रुपयांना बुडविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जे देताना बँकांनी हात वर केले आहेत. थकलेल्या कर्जाची वसुली झाली नसल्यामुळे, साखर कारखान्यांच्या संचालकांना वेळोवेळी नोटीस बजावूनही काहीच फायदा होत नाही आहे. कर्जबुडव्या साखर कारखान्यांविरोधात सहकार विभागाने आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी चालवली आहे.
कोणकोणत्या साखर कारखान्यांनी जिल्हा बँकांना गंडा घातला आहे त्यावर एक नजर टाकूया
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.