मुंबई : सलमान खानचा कोणत्याही नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड 'क्रेझ' असते. त्याचे बहुतांश चित्रपट सुटीच्या दिवसांनाच प्रदर्शित होतात आणि त्यावेळी तिकिटांचे दरही वाढविले जातात. पण आता सलमानने त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटानिमित्त चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आणली आहे. 'भारत'साठी तिकिटांचे दर न वाढविण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे.
सणाच्या दिवशी महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्या कालावधीमध्ये तिकिटांचे दर अंदाजे 30 ते 40 टक्क्यांनी वाढविले जातात. यापूर्वी 'कलंक', 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान', 'झिरो' या अलीकडच्या चित्रपटांच्या तिकिटांमध्ये असाच 'ट्रेंड' दिसला होता. पण 'भारत'साठी तिकीट दर वाढविण्याच्या प्रस्तावावर सलमानने नकार दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
'भारत' हा चित्रपट येत्या पाच जून रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये सलमानसह दिशा पटानी, कॅतरिना कैफ, नोरा फतेही आणि सुनील ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास झफर यांनी केले आहे, तर संगीत विशाल-शेखर यांनी दिले आहे.
Web Title: No ticket hike for Salman Khan starrer movie Bharat
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.