गटातटाचे राजकारण संपवू आणि नव्या युवा चेहऱ्यासोबत काँग्रेसला पुन्हा उभारी देऊ - बाळासाहेब थोरात

गटातटाचे राजकारण संपवू आणि नव्या युवा चेहऱ्यासोबत काँग्रेसला पुन्हा उभारी देऊ - बाळासाहेब थोरात

मुंबई - काँग्रेससमोर कठीण काळ आहे. मात्र १९७८ ते १९८०ला देखील कठीण काळ असताना प्रदेशाध्यक्ष रामराव आदिक यांनी काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. ते नगरचे होते, मीपण नगरचा असून कठीण काळात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे पक्षातले गटातटाचे राजकारण संपवून नव्या युवा चेहऱ्यासोबत काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी सज्ज व्हा, असा निर्धार काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज पदग्रहण समारंभात केला. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित या सोहळ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत सर्व काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. सामान्य माणसांच्या मनात काँग्रेस आहे. पराभवाने खचून न जाता आपण आता घरातले पंजाचे बिल्ले बाहेर काढा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

मी पक्षात कधीही गटतट हा विषय मानत नाही, मी सर्वांना समान ठेवणार आहे; पण तुमच्या मानातले गटतट दूर करा, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत युवकांना व नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित असलेले माजी प्रदेशाध्य अशोक चव्हाण यांनी, मला कोणी राजीनामा द्यायला सांगितले नाही, ज्यांना कुणाला माझा निरोप समारंभ करायचा आहे, तो मी होऊ देणार नाही. काँग्रेस माझ्या रक्तात आहे, अशा भावना व्यक्त केल्या. 

या वेळी राजीव सातव, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, नसीम खान, रजनी सातव, मल्लीकार्जुन खर्गे यांचीही भाषणे झाली.

Web Title: Politics Congress Balasaheb Thorat Politics

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com