राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढू लागलाय. संपुर्ण आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत असतानाही संसर्गाचं प्रमाण का वाढू लागलंय? पाहूयात एक रिपोर्ट..
राज्यभरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आता नागरिकही बेफिकीरीने वागू लागलेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरणं बंधनकारक असतानाही अनेक नागरिक विना मास्क फिरू लागल्याने धोका वाढलाय. अशा नागरिकांवर आता कठोर कारवाईला सुरूवात झालीय.
मास्कचा वापर केल्यास कोरोनाचा धोका 90 टक्क्यांनी घटत असल्याचा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलाय. अजूनही कोरोनाचा धोका पुरता टळलेला नाही, त्यामुळे मास्क न वापरण्याची तुमची बेपर्वाई तुमच्यासह तुमच्या आप्तांचा जीवही धोक्यात आणतेय, हे लक्षात ठेवा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.