खोटं बोलण्यात भाजप अव्वल आहे - हितेंद्र ठाकूर

खोटं बोलण्यात भाजप अव्वल आहे - हितेंद्र ठाकूर

पालघर : भाजपसोबत जो नाही तो देशद्रोही अशी भूमिका त्यांची आहे. जनतेने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता. तर आता यांची काय अवस्था होऊ शकते. तसेच खोटं बोलण्यात भाजप अव्वल आहे, असे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत हितेंद्र ठाकूर बोलत होते. ते म्हणाले, एकवेळेस साबण-तेल जाहिरात बघून घेतलं तर चालेल. पण पंतप्रधान जाहिरात बघून घेऊ नका. भाजपसोबत जो नाही तो देशद्रोही अशी भूमिका त्यांची आहे. जनतेने इंदिरा गांधी, विलासराव देशमुख, स. का. पाटील यांचा पराभव केला होता. तर आता यांची काय अवस्था होऊ शकते? भाजप फक्त 
केकाटून, खोटं बोलण्यात अव्वल आहे. खोटं बोल पण रेटून बोल, असा भाजपचा अजेंडा आहे. 

भाजपने श्रीनिवास वनगा यांची वाट लावली. त्यानंतर भाजप-सेनावाल्यांनी योगीच्या नावाने शिमगा केला. सेनेला टोळा गुंड चालेल पण शंड चालणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: BJP is on top for speaking lies says Hitendra Thakur

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com