वादळामुळे दिल्लीतील शाळा बंद, जनजीवन विस्कळीत

वादळामुळे दिल्लीतील शाळा बंद, जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यातच उत्तर भारतात धुळीच्या वादळामुळे 127 हून जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले होते. आता दिल्लीत गुडगांवसह अन्या काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे वीज प्रवाह खंडीत झाला, तसेच झाडे मूळासकट उन्मळून पडली आहेत. या अकाळी पावसामुळे राजधानीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्यामुळे येथील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या वादळी वाऱ्यामुळे दिल्ली मेट्रोलाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ 90 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेगाने आल्यास मेट्रोची वाहतूकही थांबवण्यात येईल. 

उत्तर भारतात दिल्लीसह 13 राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना अलर्ट जारी केला आहे. या राज्यातील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com