नवी दिल्ली : कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये उद्धभवलेल्या परिस्थितीवर आज, सुप्रीम कोर्टाने भाष्य केले आहे. काश्मीरमधील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असे सांगत केंद्राने येत्या आठवडाभरात काश्मीरमधील निर्बंधांवर पुनर्विचार करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील निर्बंधांवर आक्षेप नोंदवणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. त्यावर आज, सुनावणी झाली. त्यात कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलंय. सुप्रीम कोर्टानं म्हटलंय की, अनिश्चित काळासाठी इंटरनेटवर बंदी घालणं हे आपल्या घटनेत बसत नाही. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वांत महत्त्वाचे आहे. कलम 19 (1) अंतर्गत इंटरनेट सुविधा मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. सरकारने जम्मू-काश्मीरध्ये जे निर्बंध घातले आहेत. त्यावर आठवडाभरात फेरविचार करावा, असं कोर्टानं म्हटलंय.
काश्मीरने यापूर्वी खूप हिंसाचार पाहिला आहे. सुरक्षेचा मुद्दा असला तरी, आम्ही मानवाधिकार आणि स्वातंत्र्य यांचा समतोल राखण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू.
-सुप्रीम कोर्ट
काय आहे काश्मीरची परिस्थिती?
Web Title: Supreme court on Jammu Kashmir internet services
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.