मुंबई: शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगात सुनावणी पार पडली. मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर आज हजर झाले होते. आजच्या शेवटच्या सुनावणीनंतर आयोग आपला निर्णय सीलबंद लिफाफ्यात महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करणार आहे. चांदीवाल आयोगाची आज सुनावणी पूर्ण झाली आहे. चांदीवाल आयोगाचे कामकाज पूर्ण झाले असून 22 मार्च रोजी हा अहवाल बनवून तो 23 मार्चला सीलबंद केला जाईल. यानंतरहा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. अनिल देशमुखांशी संबंधित 100 कोटी वसुली प्रकरणाची चांदीवाल आयोगाने चौकशी केली आहे.
दरम्यान 100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अनेक दिवसांपासून कोठडीत आहेत. चांदिवाल आयोगाने अनिल देशमुश आणि सचिन वाझेंकडून चौकशी करुन अनेक धक्कादायक खुलासे केले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. 100 कोटी वसुलीचे प्रकरण चालू असतानाच अँटिलीया केस, मनसुख हिरेन हत्या अशा घटना घडत होत्या. परंतु आता चांदिवाल आयोगाने 100 कोटी वसुली प्रकरणात काय चौकशी केली आहे. ते त्यांनी दिलेल्या अहवालातूनच उघडकीस येईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.