बबन दादा शिंदे, राजन पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची राजकीय वर्तुळात चर्चा; अजित पवार म्हणाले...

सोलापूर जिल्ह्यातील आमदार बबनदादा शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv

मुंबई: सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला (NCP) मोठे खिंडार पडले असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमची मुंबईत मिटींग सुरू आहे, यावेळी आमदार बबन दादा शिंदे यांनी फोन करुन सांगितले, मी दिल्लीत कामासाठी आलो आहे, यावेळी माझी भेट झाली. बबनदादा यांचे दिल्लीत कारखाने आहेत. मी पण मंत्री होतो, मलाही भाजपचे खासदार भेटायला येत होते, भेटायला आले म्हणून पक्षात कुणीही जात नसते, तो एक कामाचा भाग होता, अशी प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

Ajit Pawar
शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही खिंडार? दोन दिग्गज आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट

शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही खिंडार?

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला (NCP) मोठे खिंडार पडले असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी ज्यावेळी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यावेळी राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे (NCP) अध्यत्र शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar: राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार

दुष्काळ जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार

राज्या यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पीक कुजून गेली आहेत. यातच राज्याती मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे ताबडतोब अधिवेशन बोलवून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केली.

तुमच्या सरकारला बहुमत आहे तर मग तुम्हाला अधिवेशन घ्यायला कुणी अडवले आहे. आम्ही आमच्या मागण्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशी परिस्थिती असताना सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत, हा राज्यातील १३ कोटींचा अपमान आहे, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com