रश्मी पुराणिक
मुंबई : अमरावती हिंसाचारप्रकरणी Amravati Violence काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी भाजप नेत्यावर BJP Leader निशाणा साधला आहे. भाजप नेत्याची एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे त्यात मालिकांनी करत मलिकांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
मलिकांचा आरोप!
आता अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप Audio Clip शेअर करत पुन्हा अनिल बोंडेंवर Anil Bonde मलिकांनी निशाणा साधला आहे. भाजप सरकारच्या काळात एकही दंगल घडत नाही परंतु विरोधी पक्षाच्या सरकारच्या वेळी दंगल घडते ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे असे अनिल बोंडे यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहेत.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
मंत्री नवाब मलिक यांनी अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी एक ऑडिओ क्लिपचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, कॉन्फरन्स कॉल झाला आहे. यामध्ये अनेक लोकं सहभागी आहेत. तर या कॉलमध्ये भाजप नेते डॉ. अनिल बोंडे हे संभाषण करत होते. यावेळी अनिल बोंडे यांनी महाराष्ट्रासह गुजरातमधील दंगलीवर आपलं भाष्य केले आहे. ते म्हणत आहेत की, भाजपचे सरकार आल्यास दंगल होत नाहीत, परंतु भाजपचे सरकार नसल्यास दंगल होते. ही दंगल मुस्लिम भागात अधिक होते याचे कारण त्यांना नेत्यांचे संरक्षण आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात फडणवीस सरकराच्या BJP Government काळात एकही दंगल झाली नव्हती. असेही अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.