शहापूर : शहापूर तालुक्यातील मुंबईला (Mumbai) सर्वाधिक पाणी पुरवठा करणारे भातसा धरण (Bhatsa Dam) आज भरून वाहू लागले आहे. यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तालुक्यातील सर्वच धरणे भरून वाहू लागली असताना गेल्या चार दिवसापासून सतत पडत असलेल्या संततधार तर कधी जोरदार पावसामुळे (Heavy Rain) आज धरणाची पाणी पातळी 141.01 इतकी पाणी पातळी वाढल्याने शासकीय नियमानुसार धरण ओव्हरफ्लो करण्यात आले तर धरण भरल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.(Bhatsa dam overflow)
हे देखील पहा-
पाण्याचा वेग व नदीची पूजा व नदीत पाणी कमी झाल्याच्या कारणांनी तीन वेळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र आज 3 वाजून 20 मिनिटांनी शासकीय नियमानुसार धरण ओव्हरफ्लो (Overflow) करण्यात आले आहे. पहिल्या व पाचव्या अशा दोन दरवाज्यातून 25 सेंटिमीटर ने दरवाजे वर उचलण्यात येवून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले.
नदी लगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास आणखी दरवाजे उघडुन अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.