: मावळातील (maval) इंद्रायणी नदीवरील पुलाचे संथ गतीने काम सुरू असून वराळे आंबी आणि तळेगाव एमआयडीसीच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पूल लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी इंद्रायणी नदीत नागरिकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. (Maharashtra News)
जुना पूल अवजड वाहनांमुळे ढासळला असून त्यानंतर नवीन पुलाचे (bridge) काम सुरू करण्यात आले. मात्र नवीन पुलाचे काम गेली तीन ते चार वर्षापासून संथगतीने चालू आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे.
आठ ते नऊ गावांचा मुख्य रस्ता असणारा हा पूल बंद असल्यामुळे नागरिकांना (citizens), एमआयडीसी कामगारांना व शेतकऱ्यांना तसेच एमआयडीसीतील सर्व कंपन्यांची वाहतूक नऊ ते दहा किलोमीटर अंतराचा वळसा घालून होत आहे. या पुलाचे काम चालू करण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. दरम्यान आज नितीन मराठे जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्त्वाखाली इंद्राणी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.