अजित पवारांनी पूरपरिस्थितीवरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; 'आम्ही उंटावरून...'

राज्यात दोन जणांचं मंत्रिमंडळ असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Eknath Shinde and ajit pawar
Eknath Shinde and ajit pawar saam tv

सुशांत सावंत

मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने काही जिल्ह्यांना चांगलंच झोडपलं. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. राज्यातील ज्या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनत नुकसान झालं. दरम्यान, राज्यात केवळ दोन जणांचं मंत्रिमंडळ असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Eknath Shinde News )

Eknath Shinde and ajit pawar
Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का ? पवार म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार हे दौऱ्यावर थोडे उशिरा पोहोचले आहे. गडचिरोलीच्या टोकाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी असे दोघे गेलो होतो. पूर ओसरल्यानंतर अजितदादा गेले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस हे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया याठिकाणी जेव्हा पूर परिस्थिती होती, तेव्हा फिरत होते. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही'.

Eknath Shinde and ajit pawar
Teacher Resignation letter Viral: उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी इंदापूरच्या शिक्षकानं नोकरी सोडली

'जेव्हा राज्यात काही ठिकाणी पूरपरिस्थिती होती. त्यावेळी आमची संपूर्ण यंत्रणा मदत करत होती. आज युद्ध पातळीवर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, त्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे.सरकार शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन-तीन दिवसांत १०० टक्के पंचनामे होतील. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल. यात मी आणि उपमुख्यमंत्री जातीने लक्ष देत आहे. कॅबिनेटमध्ये देखील याचा आढावा घेतला आहे. मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात सरकार आहे. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही', असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com