ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे
Pune: नाशिक पदवीधर निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सत्यजित तांबे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आज ( ४ जानेवारी) रोजी पत्रकार परिषद घेऊन मधल्या काळात झालेल्या राजकारणाचा पर्दाफाश केला. सत्यजित यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले . तसेच, माझ्याविरुद्ध मोठं राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचेही ते म्हणाले.
या आरोपानंतर नाना पटोले काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली होती. मात्र पत्रकारांशी बोलताना नाना पटोले टाळाटाळ करताना दिसून आले. (Nana Patole)
काय म्हणाले नाना पटोले..
सत्यजित तांबेनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेस प्रदेश कार्यकारिणीवर मोठे आरोप केले होते. यावर बोलताना नाना पटोलेंनी हा सगळा हायहोल्टेज ड्रामा होता असे म्हणत त्यांच्याबद्दल हाय कमांड निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दिली.
त्याचबरोबर "महाविकास आघाडीमध्ये आमच्या कुणातच वाद नाहीत. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व आलबेल आहे का? विखे आणि फडणवीस यांच्यामध्ये आलबेल आहे का? तिकडे का नाही तुम्ही बघत? आमच्याकडेच तुमचं लक्ष जास्त असतं असे म्हणत माझ्याकडे खूप मसाला वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार," असा सुचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याबद्दल पुढे बोलताना "विखेंच्या बद्दल काही दिवसांनी बोलणार आहे. मी एकदम पद्धतशीर बोलणार आहे. आता आमच्या मित्राच्या मागे लागले आहेत. माझे मित्र कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत. आता त्यांची जागा हे घ्यायला पाहत आहेत," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
"मी विखेंवर बोलत नाहीत. नंतर उत्तर देतो ज्या लेव्हलवर आम्हाला बोलायचं आहे त्या लेव्हलवर आम्ही बोलू. नाशिकमध्ये जो काही सर्वपक्षीय हाय व्होल्टेज झालाय ते सगळ्यांना माहिती आहे. आमचे प्रवक्ते सर्व पुरव्यांनिशी माहिती देतील. त्यावर त्यांनी बोलाव," असेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.