पुणे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांच्या समवेत शिवसेनेचे (Shivsena) माेठ्या संख्येने आमदार असल्याचा दावा करीत बंड पुकारले आहे. शिंदे हे सूरतहून (surat) गुवाहटीस रवाना झाले आहेत. सध्या महाराष्ट्राचे सरकार काेसळेल अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान या सर्व गाेष्टींबाबत घटनाकार उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी नियमाप्रमाणे आगामी काळात राज्यातील सरकारचे (maharashtra government) काय हाेऊ शकते, नवा मुख्यमंत्री हाेईल का, राष्ट्रपती राजवट लागू हाेईल का याबाबत महत्वाची माहिती साम टीव्हीशी चर्चा करताना सांगितली आहे. (maharashtra politics latest marathi news)
बापट म्हणाले शिवसेनेचे 55 आमदार आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदे यांना 37 अथवा त्यापेक्षा जादा आमदारांचा पाठिंबा असेल तर त्यांच्याकडे बहुमताचा आकडा असल्याचे स्पष्ट हाेईल. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा प्रमाणे अपात्र ठरणार नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला आणि सरकार पडले तर राज्यपाल विराेधकांना (देवेंद्र फडणवीस) सत्ता स्थापनेची संधी देतील.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाही म्हटल्यास तर काेणीच मुख्यमंत्री हाेऊ शकणार नाही. राज्यपाल राष्ट्रपती यांच्याकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकेल. त्यानंतर राज्यात सहा महिन्यांत निवडणूका घ्याव्या लागतील (ताे कार्यकाळ वाढवता पण येताे). राज्यपाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रूग्णांलयातून कारभार पाहू शकतील असेही बापट यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.