मुंबई: राज्य सरकारनं (State Government) केलेला कायदा फेटाळत 15 दिवसांत निवडणुका जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. भाजपने तर ठाकरे सरकारनेच ओबीसीचा गळा घोटल्याचा आरोप केला आहे. आज भाजपने ओबीसी मोर्चाची बैठक (OBC Reservation) आयोजित केलीय..या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारमधील तीन पक्षातील मालकांनाच ओबीसींना आरक्षण द्यायची नसल्याची टीका केली आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाजपचा डीएनए ओबीसी आहे आणि याचमुळे आगामी निवडणुकामध्ये ओबीसीना 27 टक्के तिकीट देणार असल्याचे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आरोप केल्यानंतर मविआचे नेते तरी कसे गप्प राहतील. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच पलटवार केलाय.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुरू झालेले हे राजकीय वादळ इतक्यात तरी शांत होईल असे दिसत नाही. पण आगामी निवडणूकित ओबीसी समाज कुणाच्या बाजूने उभा राहील हे निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. तूर्तास तरी निवडणूकांच्या तोंडावर यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप होतील यात मात्र शंका नाही.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.