मुंबई : राज्यातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत यावरुन विरोधकांना सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधकांनीही हे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच परराज्यात गेल्याचा आरोप केला आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ((Devendra Fadnavis) ) यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. टाटा एअरबस प्रकल्प बाहेर जाणार हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती होतं.
टाटाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प उभारावा असं वातावरण नाही, असं मी म्हटलं होत. आता त्यापलीकडे जाऊन सांगतो की, Tata एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार असं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घरी जाऊन टाटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. साम टीव्हीच्या सामर्थ्य महाराष्ट्राचे - वेध भविष्याचा - मंथन विकासाचे या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. (Latest Marathi News)
उद्योग वाचवण्यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले आहेत. सॅफ्रन प्रकल्प एक वर्षांपूर्वी बाहेर गेला होता. अलिकडच्या काळात केंद्र सरकार आपली भूमिका स्पष्ट करत असते. जो कांगावा केला जातो तो चुकीचा आहे. 100 उद्योगांच्या मागे जेव्हा आपण लागतो तेव्हा 10 उद्योग येतात. येत्या काळात महाराष्ट्रात मोठे उद्योग येतील. उद्योग जेव्हा येतात तेव्हा ते तिथले वातावरण बघत असतात. जेव्हा तुमच्या राज्यात गृहमंत्री जेलमध्ये जातात आणि मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटक ठेवली जातात, तेव्हा उद्योग कसे येणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.