पोलीस बदल्यांवरून पोलीस दलात नाराजी; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

पोलीस बदल्यांवरून पोलीस दलात नाराजी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. साकीनाका बलात्कार प्रकणाबाबत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पोलीस बदल्यांवरून पोलीस दलात नाराजी; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
पोलीस बदल्यांवरून पोलीस दलात नाराजी; देवेंद्र फडणवीस यांचा आरोपSaam Tv News

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: पोलीस बदल्यांवरून (police transfers) पोलीस दलात नाराजी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devenda fadanvis) यांनी केला आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर (९ सप्टेंबर) रोजी बलात्कार झाला होता. (mumbai sakinaka rape case) त्या महिलेचे आज (११ सप्टेंबर) निधन झाले होते. याबाबत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्या केले आहे. (Dissatisfaction with the police force over police transfers said the Opposition leader Devendra Fadnavis)

हे देखील पहा -

पोलिस दलातील नाराजीबद्दल फडणवीस नक्की काय म्हणाले?

पोलिस दलातील नाराजीबद्दल फडणवीस म्हणाले की, पोलीस दलात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या आहेत. मुळात जे घडत आहे, ते सतत घडत (बलात्काराच्या घटना) आहे हे राज्यासाठी योग्य नाही. या वारंवार घडत असलेल्या घटनांनुळे जनतेमध्ये असुरक्षितेतची भावना आहे. पोलीस दलामध्येही नाराजी आहे. मागील सततच्या बदल्यांमध्ये काय परिस्थिती झाली ते आपण बघितलं, सीबीआय बदल्यांची चौकशीही करतेय. काल बदल्या झाल्या त्याबाबत अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी माझ्याकडे बोलून दाखवलं की, हे सगळं नियमबाह्य सुरू आहे. आम्हाला (सरकारला) सोयीची लोकं आम्ही आणु यामुळे काही प्रमाणात पोलीस दलात नाराजी आहे. स्टेट कॅडरमधील अधिकाऱ्यांना डावलले गेले, पोलीस दलातील हस्तक्षेपामुळे नाराजी आहे त्यामुळे पोलीस दलात बेशिस्त पणा दिसून येतो. राज्याकरर्त्यांनी अधिकाऱ्यांना तक्रार करायची वेळ आणू नये असंही फडणवीस म्हणाले.

साकीनाका बलात्कार प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले?

साकीनाका बलात्कार प्रकरणावर फडणवीस म्हणाले की, साकिनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. ज्या प्रकारे बलात्कार घटना होत आहे याकचे लक्ष देण्याची गरज आहे. पुणे, अमरावती, पालघर, नागपुर येथील बलात्काराच्या घटना भयावह आहेत. मुंबईचा लौकिक सेफ सिटी म्हणून आपण बघतो, पण आता तरी राज्यसरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) या प्रकरणाचा खटला चालवावा आणि या घटनांमधील नराधमांना फाशीची शिक्षाच व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच राज्यसरकारने याबाबत प्रयत्न करावेत अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

शक्ती कायदा राज्यात दिड वर्षांपासून प्रलंबित

राज्य सरकारचा शक्ती कायदा राज्यात दिड वर्षांपासून प्रलंबित आहे. पण जर अशा घटना वारंवार घडल्या तर राज्यात महिलांमध्ये असुरक्षितेची भावना तयार होईल. मात्र सध्या आपल्याकडे असलेल्या कायद्याचा वापर करुन आपण फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकणाचे खटले चालवून नराधमांना शिक्षा देऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यसरकार महिला आयोगावर महिला अध्यक्ष नेमण्याबाबत आश्वासन देतात, पण सरकारने अजून कारवाई केली नाही. कारण महिला आयोगावर अध्यक्ष नेमण्यासाठी सरकारला फुरसत नाही असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

पोलीस बदल्यांवरून पोलीस दलात नाराजी; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
Sakinaka: हात जोडतो आता तरी जागे व्हा- प्रवीण दरेकरांची सरकारला साद

सरकारने आत्मचिंतन करावं

सरकारने, मनाला वाट्टेल तशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे पोलीस दलात प्रचंड नाराजी असल्याचा आरोप, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. आमचे अधिकारी पवार साहेबांना भेटायचे मी मुख्यमंत्री असताना कधी अडवले नाही. अधिकाऱ्यांना तक्रार करायची वेळ आणू नये. पालकमंत्र्यांनी रुग्णालयात गेलं पाहिजे. गृहमंत्री कोण, त्यावरून प्रशासनावर दबाव येतो जनतेला वाटतं सरकार कारवाई करते. मला अनेक अधिकारी भेटतात, त्यांना का भेटत नाहीत, असे त्यांना वाटत असेल तर त्यांना त्याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com