मुंबई : महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील (Jaynat Patil) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती केली आहे. तसंच महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपाल म्हणाले होते की, 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे.' त्यांच्या या वक्तव्यावरुन आता राज्याच्या राजकारणातील वातावरण ढवळून निघालं आहे. शिवाय राज्यपालांकडून सर्व स्तरांतून टीका होत आहे अशातचं आता जयंत पाटील यांनी देखील टीका केली आहे.
पाटील म्हणाले, 'घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे.
पाहा व्हिडीओ -
दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे. महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान माननीय राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का? राज्यपाल महोदय मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार अपमान का करत आहेत? असं ट्विट करत जयंत पाटील यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.