
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट उद्या शुक्रवारी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत. या पत्रात ४२ आमदारांच्या सह्या असणार आहेत. आज आणखी काही आमदार येणार असल्याने त्यांच्या सऱ्ह्या घेऊन पत्र पाठवणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४२ आमदारांसह बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे गट उद्या राज्यपाल यांना पत्र देणार असल्याचे बोलले जात आहे.
सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन, शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे यांच्या समोर येऊन मागणी करा विचार केला जाईल, असं सूचक विधान केले आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ३८ आमदारांसह बंड केल्याचे समोर आले. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा सकाळी करण्यात आला. या संदर्भात फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या संदर्भात आता शिवसेनेच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, भाजपने त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
'जे आमदार या क्षणी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, या सर्व आमदारांची इच्छा असेल की महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा तर त्यांनी मुंबईत यावे. उद्धव ठाकरेंसमोर मागणी करा विचार होईल, २४ तासात त्यांनी येऊन सांगावे विचार होईल, असे सूचक विधान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या (ShivSena) ४२ आमदारांनी बंड केल्याचा दावा करण्यात आला, या संबंधित व्हिडिओ, आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवा दावा केला आहे. एकनाथ शिंदें यांच्या ताब्यात असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहे, ते आमदार आमच्याशीच आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)
भाजपने (BJP) शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील, असं संजय राऊत म्हणाले.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.