अंबरनाथ शहरात कचराप्रश्न पेटला; नगरपालिकेनं ओला कचरा उचलणं केलं बंद

८१ मोठ्या आणि १७० मोठ्या सोसायट्यांमध्ये कचरा साचला.
अंबरनाथ शहरात कचराप्रश्न पेटला; नगरपालिकेनं ओला कचरा उचलणं केलं बंद
अंबरनाथ शहरात कचराप्रश्न पेटला; नगरपालिकेनं ओला कचरा उचलणं केलं बंदअजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथ Ambernath शहरात ओला- सुका कचरा Garbage प्रश्न पेटला आहे. कारण मागील ७ दिवसांपासून पालिकेने Municipality सोसायटी मधील ओला कचरा उचलणे बंद केले आहे. त्यामुळे शहरातल्या ८१ मोठ्या आणि १७० मोठ्या सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अंबरनाथ पालिकेने शहरातील सोसायट्यांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून, ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःची स्वतः लावण्याचे आदेश Order दिले आहेत.

याबाबत मागील दोन ते तीन वर्षांपासून तब्बल ५ वेळा शहरातील सोसायट्यांना नोटीसा Notice देण्यात आले आहे. मात्र, सुरुवातीचे नव्याचे नऊ दिवस नियम पाळल्यानंतर सोसायट्या पुन्हा ओला कचरा घंटागाडीत टाकायला सुरुवात करतात. त्यामुळे पालिकेने जुलै २०२१ मध्ये शहरातील दिवसाला १०० किलोपेक्षा जास्त कचरा तयार होणाऱ्या ८१ मोठ्या आणि १७० छोट्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःची स्वतः लावावी, अशी अंतिम नोटीस दिली होती.

हे देखील पहा-

मात्र, तरी देखील या आदेशाची अंमलबजावणी सोसायट्या करत नसल्याने अखेर मागील ७ दिवसांपासून पालिकेने या सर्व सोसायट्यांमधला कचरा उचलणे बंद केले होते. त्यामुळे सगळ्याच सोसायटीत अक्षरशः कचऱ्याचे ढीग लागले होते. त्यामुळे अखेर नागरिकांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत आम्हाला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नागरिकांना आणखी थोडा वेळ देण्याची मागणी केली आहे.

यामुळे तूर्तास सणासुदीचे दिवस असेपर्यंत कचरा उचलू, पण नंतर पुन्हा कचरा उचलणं बंद करणार असल्याची भूमिका नगरपालिकेने घेतली आहे. या सगळ्याबाबत अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांना विचारले असता, आम्ही पालिकेच्या वतीने सोसायट्यांना वारंवार लेखी नोटीसा दिले असून, स्वच्छता निरीक्षक, प्रभागनिहाय ब्रँड अँबेसेडर यांनी प्रत्यक्ष जाऊन अनेकदा जनजागृती केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अंबरनाथ शहरात कचराप्रश्न पेटला; नगरपालिकेनं ओला कचरा उचलणं केलं बंद
निर्माल्यात आता कचरा टाकाल तर पडेल महागात....

मात्र, यानंतरही सोसायट्या जर पालिकेच्या आदेशाला गांभीर्याने घेत नसतील, तर कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर नागरिकांनी मात्र पालिकेच्या या कठोर भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तूर्तास काही दिवस सोसायट्यांवरील हे कचरासंकट टळले असले, तरी सणासुदीचे दिवस झाल्यावर मात्र, सोसायट्यांना आपल्या ओल्या कचऱ्याची स्वतःची स्वतः विल्हेवाट लावावी लागणार आहे, अशी भूमिका पालिकेने घेतली आहे. त्यामुळे आता सोसायट्यांना स्वतःची कचरा विघटन यंत्रणा उभारणे क्रमप्राप्त झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com