
Mumbai Lake Water Lavel Today: ऑगस्ट महिन्यात मुंबईकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पुनरागमन केलं. मुंबईत अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात देखील वाढ झाली. (Latest Marathi News)
मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai News) करणाऱ्या सात तलावांमध्ये मिळून एकूण 97.07 टक्के जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा 364 दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून तुर्तास तरी पाणीकपातीचं संकट टळलं आहे.
मुंबईत अजूनही ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे तलावांमधील जलसाठ्यात आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभर पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते.
- विहार आणि तुळशी तलाव सध्या 100 टक्के भरलेले आहेत
- मोडक सागर - 99.52 टक्के
- तानसा - 98.69 टक्के
- भातसा- 98.20 टक्के
- मध्य वैतरणा - 97.68 टक्के
- अप्पर वैतरणा तलाव - 90.19 टक्के भरलेला आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.