
Mumbai Water : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. आज रोजी मुंबईतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एकूण २४ तास मुंबईतील १२ भागांमध्ये पाणी येणार नाही. २९ नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजल्यापासून ते ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद आहे. (Latest Marathi News)
यात वांद्रे ते गोरेगाव, कुर्ला, विद्याविहार, भांडुप ( या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा (Water) खंडित आहे. तर अंधेरी पूर्व, माहीम, दादर , गोरेगाव विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू असेल. खार पश्चिम विभागातही काही परिसरात पाणीपुरवठा कामी दाबाने तर काही ठिकाणी थोड्यावेळासाठी पाणी सोडले जाणार आहे.
यादरम्यान पवई उच्चस्तर जलाशयाची दुरूस्ती होणार आहे. या जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील असलेल्या बायपास जल वाहिनीवरीवर ३०० मिलीमीटर गळती होत आहे. याची दुरूस्ती या २४ तासांत पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यासह वेरावली जलाशयातील १ आणि २ साठी १८०० मिलीमीटर नविन वाहीनी जोडायची आहे. त्याचे काम देखील आज होणार आहे. २४ तास पाणी नसल्याने मुंबईकरांची (Mumbai) चांगलीच तारांबळ होण्याची शक्यता आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.