मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान Farmers Loss झालं आहे. त्या नुकसानीची भरपाई मिळत नाहीच मात्र या पीक विमा Crop insurance कंपन्यांना हाताला धरुन काही प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचार Corruption करत असल्याचे समोर आलं आहे. मात्र सरकारच्या मदती शिवाय भ्रष्टाचार होत नसल्याचं वक्तव्यं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी Raju Shetty यांनी केलं आहे. सरकार आणि कृषी मंत्र्यांचा या भ्रष्टाचारात हिस्सा आहे का ते पण आम्हाला सांगाव अशी परखट टीका त्यांनी केली होती.(If anyone understands farmers after Sharad Pawar, it is Uddhav Thackeray)
हे देखील पहा -
शेट्टींच्या याच वक्तव्यावरती प्रतिक्रीया देताना हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं वक्तव्यं शिवसेना आमदार मनीषा कायंदे ShivSena MLA Manisha Kayande यांनी केलं आहे. तसेच 'शरद पवारांच्या Sharad Pawar नंतर शेतकऱ्यांना कोणी समजत असेल तर ते उद्धव ठाकरेच' असं ही त्या म्हणाल्या.
तसेच उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray शेतकऱ्यांना मदत दिली आहे. मात्र काही पीकविमा कंपन्यांच्या आठमुठेपणामुळे शेतकऱ्यांना त्रास होतोय त्या कंपन्यांना शेतकऱ्यांकडून पैसा उकळायचा आहे असही त्या म्हणाल्या. शेट्टी कोणत्या तरी वैफल्यातून बोलत असतीलते ते अन्यायकारक असल्याचही त्या म्हणाल्या मात्र मुख्यमंत्र्याना राजू शेट्टी यांनी भेटावं असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे. ED, इन्कम टॅक्स धाड टाकतात मग पीकविमा कंपन्यांना पण फैलावर घ्या असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.