अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने पंचनामे करावेत

सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी दिपेश म्हात्रे यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने पंचनामे करावेत
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने पंचनामे करावेत saam tv

प्रदिप भणगे

डोंबिवली (Dombivali) : अतिवृष्टीमुळे (HeavyRain) कल्याण-डोंबिवली (kalyan-Dombivali) परिसरातील नदी व खाडी किनारी राहणाऱ्या तसेच सखल भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने (Tahsildar) त्वरित पंचनामे (Punchnama) करून त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.  (The tehsil office should conduct a panchnama for the damage caused by heavy rains)

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने पंचनामे करावेत
मालकाला शेतीकामात मदत करतो 'राजा' कुत्रा

डोंबिवली पश्चिम खाडी परिसर, मोठागाव, ठाकुर्ली , दिवा परिसरासह कल्याण खाडीलगत असलेला रेतीबंदर परिसर, वालधुनीनजीक असलेल्या योगीधाम, अनुपमनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासनगर, अशोकनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आणि त्यांच्या गृहोपयोगी वस्तू, विजेवर चालणारी उपकरणे आदीचे मोठे नुकसान झाले. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे त्वरित करावे आणि तो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत सरकारला द्यावा अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com