
>> अभिजित देशमुख
कल्याण तालुक्यातील आदिवासींनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वात कल्याण तहसील कार्यालयावर माेर्चा काढला. मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातील आहे. तरीही जिल्ह्यातील आदिवासी समाज मूलभूत सोयी सुविधांपासून वंचीत आहे, श्रमजिवी संघटनेनं म्हटलं आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणार असा इशारा श्रमजिवी संघटनेचे प्रदेश सचिव बाळाराम भोईर यांनी मोर्चा दरम्यान दिला आहे.
कल्याण तालुक्यात अनेक आदिवासी पाडे आहेत. ज्या ठिकाणी आदिवासी समाज मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. आदिवासी बांधवांच्या मागणीसाठी आज आदिवासी समाज बांधवांनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर घोषणाबाजी करीत या मोर्चाची काढला. (Latest Marathi News)
कल्याण तहसील कार्यालयात मोर्चेकऱ्यानी ठिय्या मांडला. समाजाला काय त्रास सहन करावा लागतो याची व्यथा तहसीलदारांसमाेर मांडली. श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर यांनी या आदिवासी बांधवांच्या मागण्यांचे मुख्यमंत्र्यांनाही पत्र देणार आहोत.
किती वाड्यांना रस्ते नाहीत. पिण्याचे पाणी नाही. किती लोकांना आधार कार्ड नाही. घरकुले नाहीत. याची गावाच्या नावासह यादी देणार. अधिकाऱ्यांनी या मागण्या पूर्ण केल्या नाही तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसल्याशिवाय श्रमजीवी संघटना राहणार नाही, असा इशारा दिला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.