सुशांत सावंत
मुंबई - महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षावरून घमासान सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतुन (Shivsena) बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. आता उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.
हे देखील पाहा -
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता शिंदे गटातील पंधरा केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. काल शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत 15 आमदार यांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गटाला सत्तास्थापनेसाठी दिवसेंदिवस नवीन संकटाना सामोरं जावं लागत आहे. मग ती आमदारांच निलंबन करण्याची सेनेची खेळी असो वा राज्यपालांना झालेली कोरोनाची लागण यामुळे जवळफास पाच दिवसांपासून गुहावाटीत ठाण मांडून असणाऱ्या बंडखोर आमदारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून आता ते माघारी फिरणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.