Raj Thackeray On 350th Shivrajyabhishek Sohala: '...तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल', शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरे यांचं ट्वीट

'...तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल', शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरे यांचं ट्वीट
Raj Thackeray
Raj Thackeray Saam TV

Raj Thackeray On 350th Shivrajyabhishek Sohala: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Raj Thackeray
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं आव्हान! ठाण्यात राष्ट्रवादी ठाकरे गटासाठी जागा सोडणार?

आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ''३५० वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा या देशात जेंव्हा पडत नव्हतं, तेव्हा एका राजाने स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती. त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्रज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हे महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होती.'' (Latest Marathi News)

ते पुढे म्हणाले की, ''मी आणि माझे सहकारी उद्या सूर्योदयाच्या आसपास महाराजांना रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहोतच, पण माझी एक तीव्र इच्छा आहे. ती म्हणजे हा सोहळा आणि त्याचा इतिहास, त्याचं महत्व आपण मराठी जनांनी जगाला ओरडून सांगायला हवं. तेवढ्यावर न थांबता जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराजांच्या काळातील महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी एकत्र यायला हवं, झटायला हवं. अन्यथा हा सोहळा फक्त एक उपचार होईल, उत्सव होईल.''

Raj Thackeray
Sharad Pawar Meets Cm Eknath Shinde: पवार-शिंदे यांच्या भेटीमागचं कारण काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

राज ठाकरे ट्वीट म्हणाले, ''बाबासाहेब पुरंदरेंचं एक खूप छान वाक्य आहे, परदेशात त्यांच्या महापुरुषांचे पुतळे उठसुठ बघायला मिळत नाहीत. कारण ते महापुरुष, त्यांचे विचार, त्यांच्या रक्तात सामील झालेले असतात. आपल्याकडे महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते.''

ते म्हणाले, ''हे चित्र बदलण्यासाठी, प्रत्येकाच्या मनात, रक्तात शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सामील झाले, तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल. यासाठी मराठी जनांनी निर्धार करायला हवा, शपथ घ्यायला हवी आणि त्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यापेक्षा उत्तम क्षण अजून कुठला असणार?''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com