मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येतो आणि पाऊस संपला की निघून जातो, शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे... शिंदे मिंथे काही नाही, अशी टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली. (Maharashtra Political News)
शिवसेना एकच आहे दुसरी शिवसेना महाराष्ट्रात नाही, असंही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन आणि दैनिक ‘सामना’चा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ), आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना संपवण्याचे काम देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. आपण त्यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही रक्त, प्राण, बलिदान यातून आपला पक्ष उभा राहिला आहे. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येतो पाऊस संपला की गांडूळही दिसत नाही. महाराष्ट्र म्हटला की उद्धव साहेब आणि बाळासाहेब, शिवसेना एकच आहे दुसरी शिवसेना निर्माण होणार नाही, असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) ठणकाऊन सांगितलं आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आपलं सरकार सत्तेत आलं तेव्हा तीन चाकी सरकार आहे असं काहीजण म्हणत होते. पण आता चौथ चाक लागलं आहे, आणि दोन स्टेफन्या देखील तयार आहेत. आम्ही दगडच आहोत. पण बाळासाहेबांनी आमच्यावर सिंधूर थापलं. शिवसेनेशी गद्दारी करणारे हे ४० दगड (शिंदे गटातील आमदार) गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.