पुणे : औरंगाबाद येथे २१ एप्रिल रोजी मनोज आव्हाड (Manoj Awhad) या मातंग समाजातील तरुणाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
हे देखील पाहा :
हातात निषेधाचे फलक घेऊन, तसेच मनोज आव्हाडच्या मारेकऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला. मनोज आव्हाड हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मनोज आव्हाड च्या मारेकऱ्यांना फाशी द्या, अशी अशी मागणी यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याच बरोबर मनोज आव्हाड हत्या प्रकरणाची दखल न घेतल्याच्या आरोपावरून यावेळी आरपीआयच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
आरपीआय आठवले गट, मातंग आघाडी प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, आरपीआय पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्रभाऊ चव्हाण, आरपीआय नेते परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव आणि आरपीआयचे ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला होता.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.