
डोंबिवली : एमआयएमचे (MIM) नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली. त्यांतर मनसेही आक्रमक झाली आहे. याबाबत मनसे (MNS) आमदार राजू पाटील यांनी ओवेसी यांच्यावर टीका करताना सध्या जो काही प्रकार सुरु आहे. त्यामुळे अशा लोकांची हिम्मत होते असे सांगत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
हा एक नवीन पायंडा ओवेसीने पाडला आहे. जे सर्वस्वी चुकीचं आहे, या कबरला ऐतिहासिक महत्व आहे, म्हणून ठीक आहे. मात्र अशा गोष्टींची महाराष्ट्रात गरज नाही. आतापर्यंत मुस्लिम बंधू तिकडे जात नव्हते. मग आताच हा पायंडा का पाडला. त्याला माहित आहे सरकार आम्हाला काहीच करू शकत नाही. सरकारला गृहीत धरतात, सरकारची धास्ती राहिलेली नाही. हा जो चुकीचा पायंडा पाडला आहे, त्याचा सरकाराने निषेध करायला पाहिजे. मात्र तस होताना दिसत नाही, असंही पाटील (Raju Patil) म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.