
महिनाभरापासून रुसलेल्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाने दोन दिवस दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांच्या जलसाठ्याचा चांगली वाढ झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये एकूण ९६ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. यातून मुंबईकरांची मे महिन्यापर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार ७ तलावांमध्ये दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुढील २२ दिवस पुरेल इतक्या पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. महिनाभर पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांचा चिंता वाढली होती. मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार होती. पाऊस पडला नसता तर मुंबईमध्ये १० ते २० टक्के पाणीकपात करण्याचा विचार महापालिकेचा होती. (Latest Marathi News)
सध्या तानसा, मोडकसागर, तुळशी आणि विहार हे चारही तलाव १०० टक्के भरले आहेत. तर भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा ही धरणे अजून १०० टक्के भरलेली नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात पाऊस असाच सुरु राहिल्यास ही धरणेही १०० टक्के भरतील, तर मुंबईकरांची पाण्याची चिंताही १०० टक्के मिटेल. (Mumbai News)
मोडक सागर- १०० टक्के
तानसा - ९९.०२ टक्के
विहार - १०० टक्के
तुलसी- १०० टक्के
भातसा- ९८.२० टक्के
मध्य वैतरणा - ९६.९८ टक्के
अप्पर वैतरणा- ८८.४४ टक्के
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.