
राज्यात ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने नागरिकांची चिंता वाढला आहे. अनेक धरणांमधील पाणीसाठाही मागील वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे.
मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमधील पाणीसाठी 90.37 टक्क्यांवर आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 90.37 टक्के इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी पातळी कमीच आहे. (Latest Marathi News)
मुंबईला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा येथून पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, तानसा येथील पाण्याची पातळी 97.47 टक्के आहे.
मोडक सागरमध्ये 91.80 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्य वैतरणा 96.29 टक्के, अप्पर वैतरणा 78.83 टक्के, भातसा 90.25 टक्के, विहार 100 टक्के आणि तुळशीमध्ये 99.05 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान, गुरुवारी मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. IMD ने मुंबईसाठी गुरुवारी ग्रीन अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात काही वाढ होण्याची शक्यता आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.