मावळ: मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग हा दोन हजार साली तयार करण्यात आला होता. त्यावेळी मावळातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी या द्रुतगती मार्गासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. इंद्रायणी भारताचं आगार म्हणून ओळखले जाणारे मावळात मोठ्या प्रमाणात पीक घेण्यात येते आणि पीक देणाऱ्या जमिनी त्यावेळी सरकारने घेतलेल्या.
हे देखील पहा -
आतापर्यंत चार वेळा मावळातील शेतकऱ्यांच्या जमिनी विकास कामासाठी घेण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, बंद पाईप लाईन, हायपर लूक, आणि पवना धरण. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र सरकारने आमचाही थोडाफार विचार करावा. दरम्यान आता मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला तीस-तीस मीटर जमीन संपादित करून महामार्गाचे रुंदीकरण करणार आहे. द्रुतगती मार्गाच्या लागत असलेल्या जमिनी सोबत शेकडो घरे, मंदिर, गाईचे गोठेही जाणार आहे. अगोदरच चार वेळा आमच्या जमिनी पीएमआरडीने घेतल्या आहेत. आता सर्विस लाईनसाठी जर आमची जमीन घेतली तर आमच्याकडे जमीनच राहणार नाही, आम्ही भूमिहीन होऊ आणि आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.
त्यामुळे सरकारने द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण त्वरित थांबवावे नाहीतर, आम्हाला आंदोलन करावे लागेल. आमचेच भूमिपुत्र खासदार आमदार आमचे नेतृत्व करतात मात्र शेतकऱ्यांची बाजू मांडण्यास त्यांना वेळ नाही. अशी व्यथा मावळातील शेतकऱ्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.