
उद्या मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे,रायगड आणि धुळेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. (Latest Marathi News)
पालघर जिल्ह्यात १६ आणि १७ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच १८ सप्टेंबरला यलो अलर्ट आहे. ठाणेमध्ये देखील पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सोमवारी यलो अलर्ट आहे. मुंबईसाठी पुढील दोन दिवस महत्वाचे असणार आहेत. मुंबईत उद्या आणि पर्वा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलं आहे.
रायगडमध्ये पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच धुळेमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातील मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाने दडी मारली.
पाऊस न पडल्याने राज्यात शेतकरी हवालदील झालेत. अशात गेल्या आठवडाभरापासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. त्यात उद्या मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबईकरांनी आपली काळजी घेऊन घराबाहेर पडावे असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.