Sharad Pawar Criticized BJP Govt : 9 वर्षांत तुम्ही काय दिवे लावले? शरद पवारांचं भाजपवर टीकास्त्र

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन-अडीच तास भाषण केलं. मात्र मणिपूरवर त्यांनी अत्यंत कमी भाष्य केलं.
 Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV

Sharad Pawar News : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजप सातत्याने मणिपूरमधील परिस्थितीला काँग्रेस जबाबदार असल्याचं म्हणत आहे. यावरुन शरद पवार यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे.

अधिवेशनात सर्वात महत्त्वाचा प्रश्न मणिपूरचा होता. मणिपूर हिंसाचाराचा प्रश्न फक्त मणिपूरसाठी मर्यादित नाही. संपूर्ण ईशान्य भारताच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अन्य देशांच्या जवळील राज्यात असं काही घडत असेल आणि केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ही चिंताजनक गोष्ट आहे. म्हणून हा प्रश्न पुन्हा पुन्हा आम्ही संसदेत उपस्थित केला. पण तरीही त्यावर योग्य पद्धतीने चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.

 Sharad Pawar
Prakash Surve News: शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंवर व्यवसायिकाचा गंभीर आरोप; खंडणी प्रकरणातला VIDEO व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन-अडीच तास भाषण केलं. मात्र मणिपूरवर त्यांनी अत्यंत कमी भाष्य केलं. मात्र मणिपूरमधील जनतेला दिलासा देण्यासाठी ज्या सक्तीने भूमिका घेण्याची गरज होती, त्या भूमिकेचा अभाव त्यांच्या भाषणात होता. त्यामुळे या चर्चेतून काहीही हातात पडलं नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

भाजप काँग्रेसवर सातत्याने याचं खापर फोडत आहे, यावरही शरद पवारांना परखड मत मांडलं. तुमच्याकडे मागील ९ वर्षांपासून सत्ता आहे. त्यात तुम्ही काही केलं नाही. पण तुम्ही ३० वर्ष काँग्रेसने काय केलं नाही हे सांगता. काँग्रेसने काही केलं नाही म्हणून जनतेने तुम्हाला संधी दिली, असं असेल तर ९ वर्षांत तुम्ही काय दिवे लागले, असा संतप्त सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

 Sharad Pawar
Marathwada Rain Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली, पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांनी माना टाकल्या

महाविकास आघाडीत कोणताही संभ्रम नाही

भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट करत अजित पवार यांच्या गटाला स्पष्ट इशारा दिला. ही आमची भूमिका आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत कोणताही संभ्रम नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. सोलापूरला असताना या सर्व गोष्टी आम्ही स्पष्ट केल्या आहेत, त्यामुळे पुन्हा पुन्हा पत्रकारांनी संभ्रम वाढवण्याची गरज नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

पावसाअभावी शेतकरी चिंतेत

राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडलेला नाही. बारामती सारख्या ठिकाणी देखील टँकर मागवावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही भागांमध्ये लोक चारा छावणीची मागणी करू लागले आहेत. पाऊस पडला नसल्यामुळे पेरण्या तर झाल्या पण पिक धोक्यात आहेत. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर असल्याची चिंता शरद पवारांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com