अक्षय बडवे
Sharad Pawar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 मे) दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडलं. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकारण पेटलं आहे. या उद्घाटन सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. 'मला समाधान वाटतंय की मी कार्यक्रमाला गेलो नाही, असे शरद पवार म्हणाले. (Latest Marathi News)
शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, 'मी त्या ठिकाणी गेलो नाही याचं समाधान आहे. जे कर्मकांड सुरू होतं, त्याच्यावरून असं दिसतंय की नेहरू यांनी आधुनिक लोकशाहीची जी संकल्पना मांडली. पण या कार्यक्रमावरून देश मागे गेला आहे'.
'राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना बोलावलं पाहिजे होतं. त्यांच्या भाषणातून अधिवेशन सुरू होत असते. राज्यसभेचा मी सदस्य आहे. त्याचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत. त्यांची उपस्थिती दिसली नाही. हा कार्यक्रम मर्यादित लोकांसाठी होता की काय, असं वाटतं आहे, असे शरद पवार म्हणाले.
'संसदेच्या जुन्या इमारतीशी आमची बांधिलकी आहे. नवीन इमारत चर्चा काही मर्यादित लोकांसाठी होती का,असा सवाल शरद पवार यांनी केला.
'कदाचित माझ्या घरापर्यंत आमंत्रणाचे पत्र आलं असेल, पण माझ्या हातात आलं नाही. अमित शहा यांनी सगळ्यांना बोलावले पाहिजे होतं. असा सोहळा नियोजन करून करायला पाहिजे होता, असे शरद पवार पुढे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.