श्रेयस सावंत
मुंबई : माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना सोलापूरमध्ये एका हॉटेल चालकाने अडवल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर सदाभाऊ खोत यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. मात्र, सदाभाऊ खोत यांच्या सुरेक्षा पुरवण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अनिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सदाभाऊ खोत यांना कशाला सुरक्षा दिली , असा सवाल राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांनी केला आहे. ( Maharashtra Politics News In Marathi )
अनिल पाटील म्हणाले, 'सदाभाऊ खोत आणि हॉटेल मालकामधल्या वादावर मी काही बोलणार नाही. पण ज्या प्रमाणे सदाभाऊ खोत काही गोष्टी सांगतात किंवा जे आरोप शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर लावतात तो अत्यंत चुकीचा आहे. खरं तर उधारी या विषयी त्यांनी विचार केला पाहिजे. सदाभाऊ खोत हा रांगडा माणूस आहे, त्यांना कशाला सुरक्षा पाहिजे. उलट त्यांच्यापासून लोकांना सुरक्षा (Security) द्या. त्याची जास्त गरज आहे. सदाभाऊ खोत यांना कशाला सुरक्षा दिली पाहिजे, यावर विचार करण्यासाठी मी गृहमंत्र्यांना विनंती करणार आहे.
हॉटेलची उधारी मागणारा व्यक्ती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता : सदाभाऊ खोत
दरम्यान, उधारीसाठी हॉटेल मालक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी चांगलीच हुज्जत घातली होती. या घटनेची राज्यात चांगलीच चर्चा सुरू झाली. यावरून सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'दोन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर असताना अनुचित प्रकार घडला. त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असून याचा भांडाफोड मी करत आहे. हॉटेल मालक म्हणत आहे की, राष्ट्रवादीशी काही संबंध नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी लावण्यात आलेल्या एका बॅनरवर हॉटेल मालकाचा फोटो आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पत्रकावरही त्याचा फोटो आहे. निवडणुकीत मुलाच्या सांगण्यावरून जेवणावळ घातली असा आरोप केला आहे'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.