~ रश्मी पुराणिक
ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढण्याबाबत मंत्रिमंडळात जी चर्चा झाली त्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका मांडली. आम्ही कोणत्याही आरक्षणाच्या विरोधात नाही, पण आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळायला हवं असेही ते यावेळी म्हणाले. तसेच, ओबीसी समाजाचे नुकसान होईल, अशी कोणतीही गोष्ट महाविकास आघाडी सरकारने करू नये अशी आक्रमक भूमिका भुजबळ यांनी मांडली.
हे देखील पहा :
तर, जितेंद्र आव्हाड यांनी वंजारी समाजालाही ओबीसी समाजातूनच आरक्षण मिळावे, अशी भूमिका मांडली. विमुक्त जमाती व भटक्या जाती प्रवर्गातून वंजारी समाजाला जे आरक्षण देण्यात येते त्यातून वंजारी समाजाचे नुकसान होत आहे.
विशेषतः शैक्षणिक आरक्षणाबाबत नुकसान होत आहे. त्यामुळे वंजारी समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आज भुजबळ आक्रमक झाले होते.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.