श्रयेश सावंत
मुंबई : एस टी कर्मचाऱ्यांच्या संप अजुन देखील सुरूचं आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनासोबत बैठक घेतली. मात्र, ही बैठक दवाबचं राजकारण आहे, अशी टीका सदावर्ते यांनी यावेळी केली आहे. शरद पवार आणि अनिल परब यांनी ही बैठक बेकायदेशीर घेतली आहे, असा ही अरोप त्यांनी यावेळी केला आहे. आणि हे एसटी कर्मचारी अजुनही माझ्या बाजुनी आहेत. त्यामुळे अजुनही त्यांच वकील पत्र माझ्याकडेचं आहे हे वक्तव्य ही त्यांनी यावेळी आहे. (Latest News on st strike)
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. आज एसटी कर्मचारी कृती समिती आणि शरद पवार, अनिल परब यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली आहे. आणि या बैठकीत कृती समितीने कर्मचाऱ्यांना संप मागे घेवून कामावर जाण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून संप सुरू आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आज 22 संघटनांशी चर्चा केली. विलीनीकरण ही प्रमुख मागणी होती. मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) त्रिसदस्यीस समिती नेमली आहे.
हे देखील पहा-
विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. कर्मचाऱ्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही पगारवाढ केली आहे असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने पगारात तफावत आहे, त्यामुळे आज चर्चा करुन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (St Bus Strike)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.