
Mumbai News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये आमदार भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर होतं. कोकण असो किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना आपल्या शाब्दिक हल्लाने अंगावर घेतलं. विधीमंडळातही त्यांची आक्रमक अनेकांनी पाहिली. मात्र तेच भास्कर जाधव आता विधीमंडळात पुन्हा दिसतील की नाही असा प्रश्न उपस्थित झालं आहे.
उद्या गुडी पाडव्याची सुट्टी असल्याने आणि पुढील काळात सभागृहात बसण्याची इच्छा नसल्याने मी निघून जात आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांचं यावेळी दर्शन घेतलं. अधिवेशन काळात बोलू न दिल्याने आणि कोणतीही लक्षवेधी न लावल्याने जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Political News)
मी विधीमंडळात येणार नाही कारण माझी इच्छा राहिली नाही. मनात अत्यंत वेदना आहे. मी एकही दिवस अधिवेशनाचा चूकवत नाही. मला जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाहीये. मी नियमानं बोलण्याच प्रयत्न करतोय. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही.त्यामुळे मनात अत्यंत वेदना आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले.
शेतकरी आज संकटात आहेत. सातत्याने त्यांना अवकाळी पाऊस, गारपीट, शेतमालाला भाव नाही. यामुळे खचलेले शेतकरी टोकाचे निर्णय घेऊन जीवन संपवतात. त्यांचे प्रश्न मला विधीमंडळात मांडायचे होते. हे सरकार संवेदनाहीन आहे. त्यामुळे या सरकारला संकटात असलेल्या शेतकऱ्यांचं काहीही देणंघेणं नाही, असंही भास्कर जाधव म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.