
Mumbai News: आधीच महागाईने त्रस्त मुबंईकरांना आणखी एक झटक बसण्याची शक्यता आहे. मुंबईत वीज दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या अदानी आणि टाटा पॉवरने वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
अदानी आणि टाटा पॉवरने दाखल केलेल्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांच्या खिशाला फटका बसू शकतो. अदानी कंपनीने घरगुती ग्राहकांच्या वीजदरात सरासरी एक टक्क्याची वाढ प्रस्तावित केली आहे. तर टाटा पॉवरने दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. (Mumbai News)
पुढील महिन्यातील सुनावणीनंतर प्रस्ताव मान्य झाल्यास मार्च महिन्यात दरवाढ लागू होईल. तर एप्रिल महिन्यापासून वाढीव दरानुसार पैसे आकारले जातील. त्यामुळे पुढील महिन्यातील सुनावणीकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.
किती बिल वाढणार?
वीज दरवाढ लागू झाल्यास मुंबईकरांच्या बिलात किती वाढ होईल हे समजून घेऊयात. सध्या घरगुती ग्राहकांचं बिल ५०० रुपये येत असेल तर नव्या दरांनुसार बिलात ५० रुपयांची वाढ होऊ शकते. म्हणजे नव्याने येणारं बिल ५०० रुपयांऐवजी ५५० रुपये असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.